२०१४ निरोप समारंभ
२०१४ चा निरोप समारंभ हा एक अदभूत सोहळा, एक वेगळाच सोहळा एक वेगळे बक्षीस वितरण समारंभ. अन असा अदभूत सोहळा ‘लवासा इंटरन्याशनल कनवेन्शन सेंटर’ लवासा दासवे येथे पार पडला.
जे वादक मागील काही महिन्यान पासून ‘संघर्ष’ साठी तहान भूक, झोप, घरदार विसरून संघर्ष करत होते. या काळात पथक म्हणजे जणू त्यांचे घरच झाले होते. अश्या वादकांच्या पथक प्रेमाची छोटीशी दखल हाच या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता.
सांगताना उर भरून येतो कि भारतातील क्रमांक दोन असलेल्या इंटरन्याशनल कनवेन्शन सेंटर लवासा दासवे येथे हा भव्य सोहळा पार पडला. बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटले कि ढोलताशा पथकाचा सोहळा अश्या ठिकाणी??? हो....कारण हे ‘संघर्ष’ ढोलताशा पथक आहे !!! कारण आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करतो ....अन आमची मानसिकताच वेगळी....
ह्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी हे दुसरे तिसरे कोणी नसून आमचे पालकाच होते. सौ. कविता तेंडूलकर ,सौ संगीता आगवणे ,सौ संध्या राय ह्या अध्यक्ष पदी होत्या. कार्यक्रमाला मा. भूपेश कुमार (असिस्टंट वी. पी., टुरिझम लवासा कॉर्पोरेशन) आणि मा. सुभाषित दत्ता(सीनिअर मšनेजर लवासा कॉर्पोरेशन)उपस्थित होते.
या कार्याकामाला २०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारातील सम्मान चिन्हांचे वितरण करण्यात आले. मानाचा ‘संघर्ष आधारस्तंभ’ हा पुरस्कार श्री विनोद काशिनाथ कापुरे यांना प्रदान करण्यात आला. सलाम तुझ्या वादनाला.
या अविस्मरणीय सोहळ्यात अनेकानी आपले मनोगत व्यक्त केले . नृत्य , गायन, नक्कालांच्या कार्यक्रमामुळे रंजकतेत अजुनच भर पडली. सर्वात महत्वाचे या कार्यक्रमात फक्त वादकाच नाहीत त्यांच्या पालकांची प्रेक्षणीय उपस्थिती होती.
भावनांनी भारावलेला हा भावस्पर्शी सोहळा सर्वांच्या कायम स्वरूपी लक्षात राहील.